ठाणे -
: ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या योजनांसाठीच अर्थसंकल्प सादर झाला असावा. त्यात संपूर्ण महाराष्ट्राऐवजी पुणे, सातारा, मुंबईला प्राधान्य देण्यात आले असून, राज्याच्या विकासाला `स्थगिती' देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने कोकण, मराठवाडा, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली गेली. महाराष्ट्रात फूट पाडण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीकडून कोकण विकासाची `वायफळ बडबड' असून, कोकणासाठी एकही मोठा प्रकल्प जाहीर करण्यात आलेला नाही. मुंबई-पुण्यात मुद्रांक शुल्काचा १ टक्के दिलासा देताना, पेट्रोलवरील एक टक्का दरवाढीने समस्त जनतेच्या खिशावर डल्ला मारला गेला. मेटाकुटीला आलेल्या जनतेवर आणखी महागाई लादण्याचा हा प्रकार आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे.
स्मारक विकास निधीची घोषणा करताना तुटपुंजी ३० कोटींची तरतूद केली. त्यातून केवळ चौथरेच उभारण्याची सरकारची योजना असेल. या योजनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर, वसंतराव नाईक, शिवाजीराव देशमुख यांचा सोयिस्कर विसर पडला, हे निश्चित. ग्रामीण जनतेचे वाहन असलेल्या एस. टी. त वायफाय, नव्या बसचे स्वप्न दाखविले जात असताना, अनेक ठिकाणी डिझेलअभावी एस. टी. च्या फेऱ्या बंद पडल्या. कारण एसटीकडे पैसेच नाहीत. त्याबाबतही सरकारला आठवण राहिलेली नाही, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी जलयुक्त शिवार योजना केवळ मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या उद्घाटनासाठी बंद केली, असे म्हणावे का, असा सवालही निरंजन डावखरे यांनी केला.
महाविकास आघाडीकडून कोकण विकासाची `वायफळ बडबड' असून, कोकणासाठी एकही मोठा प्रकल्प जाहीर करण्यात आलेला नाही. मुंबई-पुण्यात मुद्रांक शुल्काचा १ टक्के दिलासा देताना, पेट्रोलवरील एक टक्का दरवाढीने समस्त जनतेच्या खिशावर डल्ला मारला गेला. मेटाकुटीला आलेल्या जनतेवर आणखी महागाई लादण्याचा हा प्रकार आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे.
स्मारक विकास निधीची घोषणा करताना तुटपुंजी ३० कोटींची तरतूद केली. त्यातून केवळ चौथरेच उभारण्याची सरकारची योजना असेल. या योजनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर, वसंतराव नाईक, शिवाजीराव देशमुख यांचा सोयिस्कर विसर पडला, हे निश्चित. ग्रामीण जनतेचे वाहन असलेल्या एस. टी. त वायफाय, नव्या बसचे स्वप्न दाखविले जात असताना, अनेक ठिकाणी डिझेलअभावी एस. टी. च्या फेऱ्या बंद पडल्या. कारण एसटीकडे पैसेच नाहीत. त्याबाबतही सरकारला आठवण राहिलेली नाही, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी जलयुक्त शिवार योजना केवळ मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या उद्घाटनासाठी बंद केली, असे म्हणावे का, असा सवालही निरंजन डावखरे यांनी केला.