दीनदयाळ उपाध्यायांच्या मूल्यांवर भाजपचा पाया रवींद्र महाजन यांचे प्रतिपादन

ठाणे - : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मूल्यांवर भाजपचा पाया उभा आहे. सचोटी, निष्ठा आणि प्रामाणिकतेच्या जोरावर समाजासाठी कार्य करण्याची त्यांची तळमळ होती. दीनदयाळ उपाध्याय यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांच्या तळमळीतूनच जनसंघ व कालांतराने भाजप उभा राहिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अभ्यासक रवींद्र महाजन यांनी येथे केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ५२ व्या स्मृतीदिनानिमित्ताने भाजपाच्या ठाण्यातील खोपट येथील कार्यालयात आज दीनदयाळजींना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री. महाजन बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर, नगरसेवक संदिप लेले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभर पसरलेल्या भाजपाचे सिंचन करणारे नेते म्हणून दीनदयाळजींची ओळख आहे. त्यांनी कायम सचोटी, प्रामाणिकता व निष्ठेबरोबरच देशप्रेमाला महत्व दिले. त्यामुळेच उच्च विद्याविभूषित असूनही ते जनसंघाच्या कार्याकडे वळले, असे श्री. महाजन यांनी नमूद केले. दीनदयाळजींच्या प्रामाणिकपणाची काही उदाहरणे दिली. भाजीविक्रेत्या महिलेला दिलेले खोटे नाणे परत मिळण्यासाठीची धावपळ, गोळवलकर गुरुजींबरोबर चर्चा करताना चुकून केलेल्या प्रवासाचे भाडे टीसीला देण्यासाठीचा आटापिटा आदी उदाहरणे श्री. महाजन यांनी सांगितली.
आपल्या पक्षाचे एक धोरण असावे. त्याद्वारे नेते व कार्यकर्त्यांना मार्गक्रमण करता येईल, हे लक्षात घेऊन दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाचे धोरण तयार केले. पक्षासाठी निश्चित धोरणाचा त्यांचा आग्रह होता. त्याचबरोबर देशाचे नुकसान होता कामा नये, यावर त्यांचा कायम कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी परदेश दौऱ्यात कधीही कॉंग्रेस सरकारवर टीका केली नाही. मी परदेशात आहे, भारतातील सरकार माझे आहे, अशी त्यांची भूमिका होती, असे श्री. महाजन यांनी सांगितले.
दीनदयाळजींनी आखून दिलेली तत्वे व मूल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून योजना राबविल्या जात आहेत, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. दीनदयाळजींचे कार्य डोळ्यासमोर ठेवून ठाणे भाजपातील प्रत्येक कार्यकर्ता मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. या वेळी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने समर्पण करुन दीनदयाळजींनी आखून दिलेल्या तत्वे व मुल्यांवर मार्गक्रमण करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.