२८ फेब्रुवारी विज्ञानदिन विशेष लेख* *वैज्ञानिक दृष्टिकोन*

 


आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला नाही.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने प्रगत केलेली साधने वापरतो,पण वैज्ञानिक दृष्टिकोनचा वापर करत नाही. विज्ञानाची करणी घेतली पण विचार सरणी आपण अंगिकारली नाही. समाजात अंधाश्रध्दा चिरकाळ टिकल्या त्याचे पहिल कारण आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हे आहे.
 
‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ याचा एका शब्दामध्ये अर्थ - कार्यकारणभाव तपासणे. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतात, असं नाही. पण ती ज्या वेळी समजतील, त्या वेळी ती कशी समजतील, हे कार्यकारणभावामुळे मला समजते. हा ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे.


समाजात कधीच चमत्कार घडत नसतात तर ते कोणीतरी घडवून आणत आसते.त्यामध्ये एक तर हात चलाखी असते किंवा त्यामागे विज्ञान असते.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर सर्व चमत्कार तपासता येतात.


आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ 'विज्ञानाच्या' आधारे झालेली आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पध्दती आहे. सत्यशोधनाचा मार्ग आहे. जीवनाचे दिशादर्शन आणि व्यक्तीला जानिवांचे स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टिकोनानेच प्राप्त होते. भारतीय संविधामुळे प्राप्त झालेल्या व मानवाला  अभिप्रेत असणाऱ्या कलम 51 नुसार विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.


आपण मागे का आहोत तर  विज्ञानाकडे केलेलं दुर्लक्ष आणि आध्यात्माला दिलेला खोट्या विज्ञानाचा मुखवटा असल्यामुळे विज्ञानक्षेत्रात भारत मागे पडण्याचे प्रमुख कारण आहे.अध्यात्माचे, मोक्षप्राप्तीचे, जन्म-मरणाचे काल्पनिक फेरे चुकविण्याचे सार्वत्रिक वेड भारतात दिसून येते.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार झाला नाही.


भारतीय संविधानात नमूद केलेल्या भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व अंगीकार केला पाहिजे." "कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही,  यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन "निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग." या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पध्दत आहे.


वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य नाकारतो. एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो.वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रंथप्रामान्य नाकारतो. कोणत्या एका पुस्तकात लिहिलेय म्हणून ते चिकित्सा न करता स्विकारणे हे नाकारतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच नम्र असतो. मी सांगितलेला शब्द अंतिम आहे,  असा दावा करीत नाही.तो नवनवीन सत्य पुराच्या आधारे स्वीकारत जातो.अर्थात  कोणत्याही घटनेच्या मागे कार्यकारणभाव आहे. म्हणजे कोणत्याही घटनेमागे कारण हे असतेच. हा स्विकार म्हणजेच वैज्ञानिक दृ़ष्टिकोन होय.
आज समाजात अनेक गोष्टी 'यामागे विज्ञान आहे,अस सांगून जनसमान्यांच्या माथी थोपवल्या जातात. त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ठरवावे.विज्ञानाला आज सगळ्या गोष्टींची कारणे माहित नाहीत,पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या आधारेच समजू शकतात.


जेव्हा आपण अवैज्ञानिक वागतो. तेव्हा आपण आपल्या जीवनाची सुत्र दुसऱ्याच्या हातात देतो. तुम्ही ज्या वेळी ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ स्वीकारता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं स्वतःच्या हातात घेता.वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करा.यामध्येच आपल्या देशाचे भवितव्य आहे.
*( संदिप  गोवळकर)*                                        *9969045602*


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.