त्या’ वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार!

त्या’ वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार!
 धनंजय मुंडेंनी तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश*
ठाणे:– : ‘सरकारी काम आणि वर्षभर थाम्ब!’ या उक्तीप्रमाणे प्रशासकीय दफ्तर दिरंगाईच्या बळी ठरलेल्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे. शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना 2 हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून भाग्यश्री राख यांची फाईल विविध टेबलांवर अडून बसली होती, अनेक अर्ज विनंत्या करूनही न्याय मिळेना म्हणून त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त ‘ वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते.


पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जवान तुकाराम राख यांना १ मे २०१० रोजी ऑपरेशन रक्षक मध्ये वीरमरण आले होते, भाग्यश्री या त्यांच्या पत्नीवर उदरनिर्वाह, लहान मुलीचे शिक्षण अशा अनेक समस्या आहेत. २०१८ मधील शासन निर्णयाप्रमाणे शहिदांच्या वारसांना २ हेक्टर जमीन देणे अभिप्रेत आहे. मात्र गेले अनेक दिवस शासकीय कार्यलयांच्या चकरा मारून व कागदपत्रांची पूर्तता करूनही आपल्याला जमीन मिळाली नाही, आपल्यावरील अन्याय दूर करावा असे निवेदन २६ जानेवारी रोजी भाग्यश्री ताईंनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले होते.


धनंजय मुंडे यांनी शहीद पत्नींच्या त्या निवेदनावर तात्काळ कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. नवीन जिल्हाधिकाऱ्यांची बीडला नियुक्ती होते न होते त्या आठवड्याभरातच भाग्यश्री ताईंनी आपल्याला न्याय मिळत नसेल तर आत्मदहन करू असा इशारा दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले.


त्यांनतर ना. मुंडे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून भाग्यश्री राख यांना तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांच्याशी देखील ना. मुंडेंनी संपर्क केला असून न्याय मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले आहे.


 


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.